live now
Maharashtra Budget : शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी पण, लाडक्या बहिणींचा हिरमोड…
Maharashtra Budget मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचा 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत...
Maharashtra Budget Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दि.6) महाराष्ट्राचा 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याबाबत कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे करोडो बहिणींची हिरमोड झाला आहे. अर्थसंकल्पात कोण-कोणत्या घोषणा झाल्या त्याचा पॉईंट टू पॉईंट अपडेट देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग….
LIVE NEWS & UPDATES
-
लाडकी बहिण योजनेसंदर्भात अर्थसंकल्पातून मोठी घोषणा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. या योजनेसाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र, 1500 ऐवजी 2100 रूपये देण्याची घोषणा फडणवीसांकडून करण्यात आलेली नाही. एकल महिलांच्या कल्याणसाठी लवकरच धोरण आणण्यात येईल. २५ लाख दीदींना लखपती करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितले.
-
शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, अर्थसंकल्पातून सर्वात मोठी घोषणा
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठित केली आहे. पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी योजना मी जाहीर करत आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्यांना लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांच्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार
-
महाराष्ट्रातील सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुकात नोंद
महाराष्ट्रातील सौर कृषी पंप योजनेची गिनीज बुकात नोंद. मागेल त्याला सौर कृषीपंप योजने अंतर्गत 6 लाखाहून अधिक पंप
-
राज्याचे नवे गुंतवणूक आणि सेवा धोरण जाहीर
- परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र वन
- प्रत्येक जिल्ह्यात एमएसएमई केंद्र
- उद्योजकता वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्यात सेवाक्षेत्र आयुक्तालय
- गडचिरोली जिल्हा 70 हजारोंना अधिक रोजगार
- गडचिरोली स्टील हब म्हणून उदयास दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार
- रोजगार निर्मितीसाठी जागतिक क्षमता केंद्र
- स्टार्टअप प्रोत्साहन करण्यासाठी विशेष योजना
- मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू
- जागतिक क्षमता केंद्राची सर्वाधिक पसंती पुण्याला
- मुंबई दुबई सिंगापूर मध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणार
- वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे
- तिसरी चित्रनगरी नागपूर जिल्ह्यात रामटेक मध्ये
- पाच ज्योतिर्लिंगांचा विकास आराखड्यासाठी तरतूद
- महानुभाव पंथाच्या महत्त्वाच्या ठिकाणांचा विकास
- 10 हुन सक्षम विकास प्राधिकरण स्थापन करणार
- अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार
- 2030 पर्यंत एम एम आर ची अर्थव्यवस्था 300 अब्ज डॉलरपर्यंत नेणार
- एम एम आर मध्ये बेकायदा झोपडपट्ट्यांना आळा घालण्याचे नव धोरण
- मुंबई दुसरी भूमिगत मेट्रो सुरू करणार
-
- मुंबई पुणे नागपूर मध्ये 490 किमी मेट्रो मार्ग
-
२०४७ पर्यंत राज्यातील पर्यटकांची संख्या ३८ कोटींवर नेणार
२०४७ पर्यंत राज्यातील पर्यटकांची संख्या ३८ कोटीपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. मुंबई, दुबई, सिंगापूर येथे पर्यटन गुंतवणूक कक्ष उभारले जातील. निवडक ५० पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी दिला जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
-
राज्यात तिसरी चित्रनगरी स्थापन करणार
राज्यातील तिसरी चित्रनगरी नवरगा तालुका रामटेक येथे विकसित करण्यात येणार आहे. नवीन पिढीला महाकवी कालिदासांचा जीवनपट कळावा म्हणून चित्रपटासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल.
-
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भूयारी मार्ग उभारणार
रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई, पुण्यात भूयारी मार्ग उभारले जाईल. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम मार्गाला जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी छेडा नगर ते साकेत नगर उन्नत मार्ग तयार केला जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
-
चौथ्या मुंबईसाठी पायाभूत सुविधा
मुंबई व पुण्याला ५० अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात २९५पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे.४ लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे. मुख्यमंत्री राज्याच्या अर्थसंकल्पात तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची घोषणा केली असून, अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई वाढवण परिसरात उभारणार आहे. तर एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार आहे. नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
-
इन्व्हेस्ट महाराष्ट्राचा नारा
राज्याचे नवीन गुंतवणूक व औद्योगिक सेवा धोरण जाहीर केलं आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंघ डिजीटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. या धोरणातून ५० लाख रोजगार निर्माण होणार आहे. तसेच यासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात येत आहे, अशी माहिती अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांनी दिली.
-
महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना
महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत २३ हजार किमी रस्ते व पुलांची कामे हाती घेतली जातील.१२३ अब्ज डॉलरवरून १५०० अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे उद्देश आहे.महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले.
-
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. याशिवाय महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना, ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनांची घोषणा फडणवीसांकडून करण्यात आली आहे.
-
फडणवीसांकडून नव्या योजनांच्या घोषणा
मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजक योजना
महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना
अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देणार
अजितदादांचं भव्य स्मारक उभारणार
देहूमध्ये विकास आराखड्याची घोषणा
महाराष्ट्र शेती अभिनय नव्या योजनेची घोषणा
बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण
-
राज्यात 23 हजार किमीचे रस्ते बनवणार
- कृषी समृद्ध योजनेअंतर्गत चार वर्षात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील
- आगामी 2 वर्षात नैसर्गित अभियानाची अंमलबजावणी केली जाईल
- मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत 30 हजार किमीची कामं पूर्ण झाली आहेत
- टप्पा 3 घोषित करत असून त्याअंतर्गत 23 हजार किमी लांबी रस्ते आणि पुलाची कामं हाती घेतली जातील
- शेतकऱ्यांसाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण करणार
- तीस लाख शेतकऱ्यांना महाविस्तार ai याद्वारे शेतकऱ्यांना माहिती
- महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या नव्या योजनेची घोषणा
- कृषी समृद्धी
- महिला शेतकऱ्यांच्या उद्योजकतेसाठी विशेष कार्यक्रम
- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा पूर्ण
- ग्रामसडक योजने आतापर्यंत तीस हजार गावात जोडली
-
अर्थसंकल्प 2047 च्या विकासाकडे जाणारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकासाकडे जाणारा आहे
- महात्मा फुले यांच्या जन्माला २०० वर्ष पुर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल
- बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील
- सामाजीक समरसता वर्ष म्हणुन साजरा केला जाईल
- बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच काम पुर्ण झालं आहे काही योजना सुरु केल्या जातील
-
अजित दादाचं भव्य स्मारक उभारण्यात येईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संत गाडगेबबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार, ग्रामसमृद्धी अभियान राबवलं जाणार. महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार असल्याचेही फडणवीसांनी जाहीर केले. माझं अंतःकरण जड झालं आहे. अजित दादांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करड्या स्वभावामुळे प्रशासनात शिस्त आणि कार्यक्षमतेची परंपरा कायम राहिली. त्यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू करण्यात येईल. हा अर्थसंकल्प मी त्यांना समर्पित करतो.
-
राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी ‘अजित पवार अमर रहे’च्या घोषणा
-
अर्थसकंल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अर्थसकंल्पाला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
-
अर्थसंकल्पाआधीच राज्याची काटकसर सुरू
इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील आमदारांना अर्थसंकल्प दिवशी दिल्या जाणाऱ्या ट्रॅाली बॅग दिल्या जाणार नाहीत. आतापर्यंत दरवर्षी अर्थसंकल्प मांडल्यानंतर अर्थसंकल्पाचे ग्रीन बूक आणि पिंक बूक सुटकेसमधून घालून दिले जात होते. गेल्या वर्षी बॅगसोबत पेन ड्राईव्ह दिला जात होता. यावर्षी बॅग देणे बंद तर केले आहेच शिवाय पेन ड्राईव्हही देणे बंद केले आहे. अर्थसंकल्पाचे पेपर्स विधिमंडळाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेण्यास आमदारांना पत्रक काढून कळवण्यात आले आहे.
-
अर्थतज्ज्ञ म्हणून देवेंद्र भाऊ यांची ख्याती आहे
राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आमदार धनंजय मुंडे यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्यात त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून देवेंद्र भाऊ यांची ख्याती आहे असे म्हणत फडणवीसांवर कौतकाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या पोस्टमध्ये ते लिहितात की, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस आज राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थतज्ञ म्हणून देवेंद्र भाऊ यांची ख्याती आहे. आज स्व. अजितदादा असते तर त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला असता, मात्र दुर्दैवाने दादा आपल्यात नाहीत. या अर्थसंकल्पातून स्व. अजितदादांचे महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न आणि व्हिजन देवेंद्र भाऊ मांडतील, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीचा रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प असेल, अशी मला खात्री आहे. स्व. दादांच्या ऐवजी आज देवेंद्र भाऊ अर्थसंकल्प मांडत आहेत, दादांच्या व्हिजनसह राज्याच्या स्वप्नपूर्तीचा हा अर्थसंकल्प प्रेरक ठरेल, असाही मला विश्वास आहे. आजच्या अर्थसंकल्पासाठी देवेंद्र भाऊंना खूप खूप शुभेच्छा.
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस आज राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
अर्थतज्ञ म्हणून देवेंद्र भाऊ यांची ख्याती आहे. आज स्व. अजितदादा असते तर त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला असता, मात्र दुर्दैवाने दादा आपल्यात नाहीत.
या अर्थसंकल्पातून स्व.…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 6, 2026
-
अजितदादांशिवाय सादर होणारा 40 वर्षातील पहिला अर्थसंकल्प : आशिष जैयस्वाल
आज राज्याचा पहिला असा मागील 40 वर्षातला अर्थसंकल्प असेल जो दादांच्या विना सादर होत आहे.आज दादांची खूप आठवण येत आहे, असं आशिष जैयस्वाल यांनी म्हटलं. महाराष्ट्रासाठी अजित पवारांचं एक स्वप्न होतं ते आम्ही साकरणार असल्याचं जैयस्वाल म्हणाले.राज्यातील गरीब, पडीतही शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या आजच्या बजेट मधून दिलासा मिळेल.महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने पुढे पाऊल टाकत आहे हे आजच्या बजेटमध्ये स्पष्ट होईल, असं आशिष जैयस्वाल म्हणाले. विधानसभेत जनतेसमोर अर्थसंकल्प सादर केला जाईल तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राला विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी आमची कटिबद्धता दिसून येईल असेही जैयस्वाल म्हणाले.
Mumbai, Maharashtra: State Minister Ashish Jaiswal says, "Please wait for the budget. When the budget is presented before the people of Maharashtra through the Assembly at 2 PM, you will see our commitment to taking Maharashtra forward on the path of development and rapid… pic.twitter.com/20vgUM66aa
— IANS (@ians_india) March 6, 2026
-
अर्थसंकल्प कसा समजून घ्यायचा? देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसकंल्प सोप्या भाषेत' पुस्तकाची लिंक
अर्थसंकल्प कसा समजून घ्यायचा? अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडे नाहीत… तो प्रत्येकाच्या भविष्याचा आराखडा असतो! तरुणांच्या स्वप्नांपासून ते ज्येष्ठांच्या अपेक्षांपर्यंत… शेतकरी, कामगार, नोकरदार, उद्योजक... प्रत्येक घटकाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे असते. म्हणूनच अर्थसंकल्प केवळ ऐकायचा नाही, तर समजून घ्यायचा आहे. सोप्या आणि स्पष्ट भाषेत अर्थसंकल्प उलगडणारे माझे पुस्तक अवश्य वाचा अशी पोस्ट फडणवीसांनी एक्सवर केली आहे.
अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडे नाहीत… तो प्रत्येकाच्या भविष्याचा आराखडा असतो!
तरुणांच्या स्वप्नांपासून ते ज्येष्ठांच्या अपेक्षांपर्यंत…
शेतकरी, कामगार, नोकरदार, उद्योजक...
प्रत्येक घटकाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे असते.म्हणूनच अर्थसंकल्प केवळ ऐकायचा नाही, तर समजून घ्यायचा आहे.
सोप्या…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 5, 2026
